HW News Marathi
महाराष्ट्र

“बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? ” दीपक केसरकारांचा नारायण राणेंना सवाल

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद अजूनही कायम आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातलं वातावरण देखील बिघडत चाललं आहे. शिवसैनिकांच्या टीकेला नारायण राणे साडेत्तोड प्रत्त्युत्तर देत आहेत तर नारायण राणेंच्या प्रत्युत्तरेला शिवसेना देखील प्रत्युत्तर देत आहे. . “जर बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. बाळासाहेब जीवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची याला माझा विरोध आहे,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही

“राणेंच्या मुलाने मला धमक्या दिल्या. या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही. कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार आहे ज्याच्या प्रॉपर्टी कमी झाल्यात. राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानंच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे,” असंही केसरकर यांनी नमूद केलं आहे.

ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथं हे चालणार नाही

“एका मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडल्याचे आदेश दिल्याचं काही लोक म्हणतात. मात्र, एका गरीब व्यक्तीला या जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. यानंतर तो व्यक्ती पेटून उठला. त्याने या नेत्याची सर्व प्रकरणं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले. गरीब माणूस काय करु शकतो हे अनेक लोकांना माहिती नसतं. मात्र, गरीब माणूस असलो म्हणून अशाप्रकारे मारला जाता कामा नये. ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथं हे चालणार नाही”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

“मारहाण झालेल्या व्यक्तीला फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं. लाखो रुपयांची आश्वासनं देण्यात आली. मात्र, त्याने आपला संघर्ष सोडला नाही. या संघर्षासाठी न्यायालयाची दारं नेहमी उघडी असतात. हे करताना तत्वांपासून मागे जायचं नसतं. तत्व सोडली तर रिझल्ट मिळणार नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती हे करु शकतो मग राजकीय पक्ष हे का करु शकत नाही?” असा सवाल केसरकर यांनी विचारला आहे.

“माझा राजकीय संघर्ष कधीही रक्तरंजित नव्हता. माझा संघर्ष मारामारीचा संघर्ष नव्हता. मी माझ्या मार्गाने गेलो, विरोधकांना मतपेटीतून हरवलं. मी जेव्हा माझी घोषणा केली तेव्हा मी शिवसेनेतही नव्हतो. मी राष्ट्रवादीत होतो आणि आमदार होतो. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन त्या संघर्षात उतरलो,” असंही केसरकर यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

News Desk

‘एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा’-आदित्य ठाकरे

News Desk

राज ठाकरेंनी राज्यपाल व संजय राऊतांची केली नक्कल, म्हणाले…

Aprna