HW News Marathi
महाराष्ट्र

ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी! – अजित पवार

लातूर | नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, साखर कारखाने यांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीचे निर्बंध आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ.अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील, महापौर विक्रांत गोजमागुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे, पहिला डोस 75 टक्के नागरिकांनी जिल्ह्यात घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील जनतेला विनंती की आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल मास्क वापरावा तसेच 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी. ओ, विविध कंपन्या, साखर कारखाने यांनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोनामुळे विकास कामावर परिणाम झाला असून या आर्थिक वर्षातल्या निधीला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. संबंधित विभागानी हा निधी विकास कामासाठी करावा, अखर्चीत निधी 31 मार्च नंतर परत करायची वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही प्रशासनाला उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या ज्या आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत, त्या सुविधा उत्तम चालाव्यात आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आरोग्य विभागांनी काम करावे अशा सूचना दिल्या. लातूर शहरात नवीन रुग्णालय उभं करण्यासाठी लागणाऱ्या जागे बद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकी समोर ठेवावा, शासन त्याला मान्यता देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करून घ्यावे, त्यात ज्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या त्रुटी काढतांना गुणवत्तापूर्ण काम करावे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले हे काम तात्काळ करून घ्यावे. आपली एक चूक दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरू नये यासाठी सर्व यंत्रणानी काम कराण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. रमाई आवास योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठीही उपमुख्यमंत्र्यांनी अनुकलता दर्शविली आहे.

लातूर मध्ये दिव्यांग उपचारासाठी केलेले केंद्र राज्यातील इतर जिल्ह्यातही करणार

जिल्ह्यातील बालकांच्या दिव्यांगावर मात करण्यासाठी त्यांच्यावर उपचार व्हावेत, म्हणून त्यासाठी लागणारे उपकारण आणि त्यात बालकांचे मनोरंजन व्हावे म्हणून तसे पूरक चित्रं काढले आहेत. हे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी आणि जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सादरीकरणातून दाखविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून आपण इतर जिल्ह्यातही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण

जिल्हाधिकारी कार्यालयात आता नवी बाग निर्माण करण्यात येणारं असून ती जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवाई वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणार असून त्याठिकाणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्म्यांना श्रद्धांजली

तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह जे जवान दुर्दैवी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावले त्यांना कार्यक्रमाच्या पूर्वी दोन मिनिट शांत राहून श्रद्धांजली देण्यात आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज ईडीसमोर हजर होणार

News Desk

यशवंत जाधव मुंबईतील जुन्या पघडीच्या ३६ इमारती विकत घेतल्या! – किरीट सोमय्या

Aprna

“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!

News Desk