HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी! – उपमुख्यमंत्री

मुंबई | औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात बॅकांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याचे डॉ कराड यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. ही योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करण्यात यावा असे निर्देश श्री फडणवीस यांनी दिले. या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. तसेच योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणा-या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देणार!

News Desk

पक्ष प्रवेशानंतर कळलं की ते शिवसेनेचे नगरसेवक होते…

News Desk

संभाजी राजेंचे नाव बिडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! 

News Desk