HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या आमदारांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या; मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई | भाजपचे आमदारांनी देवस्थान घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  मलिकांनी आज (२१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली आहे. आष्टीमधील मुस्लीम देवस्थान ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकादेशी पद्धतीने रिकाम्या करून लाटण्यात आल्या आहेत. यात हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनी सामील आहे. मुस्लीमच्या दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा देखील समावेश आहेत,” असे मलिकांनी दावा केला आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तक्रार दाखल केल्यानंतर एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती देखील मलिकांनी यावेळी सांगतली. 

दरम्यान, विठोबा देवस्थानचे ३१ एकर ४२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, राम देवस्थान ६५ एकर, खंडोबा देवस्थान बेळगाव ६५एकर, अशा अनेक ठिकाणांचा समावेश होत असल्याचंही मलिकांनी यांनी सांगितले. या घोटाळ्यासंदर्भात भाजपच्या दोन नेत्यांच्या ईडीकडे तक्रारी देखील दाखल झाल्या आहे. यात भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावावर तक्रार झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन या जमिनीच्या माललीक बदलल्याच आरोपही मलिकांनी केला आहे. 

मलिक म्हणाले, “आष्टीतील देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुरेश धस यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले. यात मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीचा यात समावेश आहे. या सोसायटीच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडप करण्यात आल्या असून या सोसायटीमध्ये असलेल्या सदस्यांना पैसे देऊन खरेदी खत करण्यात आले. याप्रकरणी राम खाडे यांनी इडेकडे देखील तक्रारी दाखल केली. यात सुरेश धस आणि भीमराव दोंदे यांचे नाव असल्याचे सांगत मलिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Aprna

अपहरण केलेल्या 12 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी केली सुखरूप सुटका

News Desk

“शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे”, मुख्यमंत्र्यांची मागणी

Aprna