HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद घटनेनंतर बोध घेण्याची नितांत गरज, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

मुंबई | काल (८ मे) औरंगाबाद येथे मालगाडी खाली चिरडून मृत पावलेल्या १६ मजूरांची घटना धक्कादायक आहेच. मात्र, यावरुन आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्षाने टीकास्त्र सुरु केले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्प फडणवीस यांनी या मजूरांना, कामगारांना आपापल्या गावी न पायी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन राज्य सरकारला केले आहे. शिवाय केंद्र सरकारसोबत योग्य समन्वय साधून कसा प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

तसेच, औगंराबादनजीक जी घटना घडली तशा घटना अनेक शहरांतून येत असलेले हे विदारक चित्र सून्न करणार आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी राज्य सरकारला यावेळी विनंती करत असे म्हटले आहे की केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. त्यांच्याशी समन्वय साधावा, अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून १० रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार असल्याचं सांगितलं आहे. “केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी लगेच चर्चा केली. १० रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार आहेत” अशी माहिती दिली. सोबतच सर्व कामगार बांधवांनी स्वतःची नोंदणी करून शासकीय व्यवस्थेतून प्रवास करावा. कृपया पायी चालत जाऊ नये अशी विनंतीही केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंसमोर पंकजांनी हत्यार टाकले? जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर पंकजा मुंडेंचा बहिष्कार!

News Desk

महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे बोर्डाने सांगितले सध्या महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही

News Desk

उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार, हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास परवानगी !

News Desk