HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुत्त्वावर शिंतोडे उडविणाऱ्या ‘त्या’ युवकावर कारवाई होत नाही, हा आश्चर्यजनक ! फडणवीस आक्रमक

पुणे । पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता अशी ओळख असलेल्या शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या व्यक्तव्यांमुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. “हिंदू समाजाबाबत शरजिल उस्मानी याने केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, या पत्रात देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ? पाहूया

देवेंद्र फडणवीस ‘त्या’ पत्रात नेमके काय म्हणतात ?

देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात की, “दि. 30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारं, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधानं केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्‍या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत.”

“या भाषणातील शब्दश: वाक्ये अशी आहेत… ‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…”, असे सांगत फडणवीस यांनी शरजिलने त्यावेळी नेमके काय म्हटले हे सांगितले.

या प्रकरणी पुढे फडणवीस म्हणतात की, “एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे.”

राज्य सरकारकडे याविषयी शरजिल विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना फडणवीस म्हणतात की, “मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश ‘-जलसंपदामंत्री जयंत पाटील

News Desk

17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार; सेना नेत्याचं मोठं वक्तव्य

News Desk

मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पुण्यात येणार नाहीत!

News Desk