HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा निरोप आला आणि फडणवीसही थांबले, कोल्हापूरात केली एकत्र पाहणी

कोल्हापूर | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज (३० जुलै) पुरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त अशा शाहुपुरीची पाहाणी करत असताना एकमेकांसमोर आले, दोघेही भेटले, आणि बोललेही. राज्यातले दोन टॉपचे नेते असे अचानक भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण या भेटीची गोष्ट वेगळीच आहे.

तर झालं असं की, मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कळालं की, फडणवीसही त्याच भागात पहाणी करतायत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा, एकत्र पहाणी करु असा आग्रही ठाकरेंनी धरला. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहुपुरीतच थांबले आणि दोघांची भेट अशा पद्धतीनं झाल्याचं समोर येत आहे.

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची ही काही मिनिटांचीच भेट उभ्या उभ्या झाली. ह्या भेटीवेळेस फडणवीसांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते तर मुख्यमंत्र्यांसोबत सेनेचे स्थानिक आमदार, मंत्री मुश्रिफही होते. दोन नेत्यांची जी उभ्या उभी भेट झाली त्यात नेमकं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं याची सर्वांना उत्सुकता लागली. नंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी त्याचा खुलासा केला. ते म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहु असं मी त्यांना कळवलं.

नार्वेकरांकडून फडणवीसांना पाठवला निरोप

मुख्यमंत्री आणि फडणवीसांची एकमेकांसोबत भेट झाली. ही भेट ठरवूनच झाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने फडणवीस थांबले आणि दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आजच्या आजच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. अवघ्या काही मिनिटाच्या या भेटीनंतर फडणवीस जायला निघाले. तेव्हा मिलिंद नार्वेकरांनी गर्दीतून त्यांना वाट मोकळी करून दिली. मिलिंद नार्वेकर हे फडणवीसांना काही अंतरावर सोडायला गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संभाजीनगर’ची भूमिका शिवसेनेची, महाविकासआघाडीची नाही ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे विधान

News Desk

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन 

News Desk

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द 

Ruchita Chowdhary