HW News Marathi
महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीस १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात’, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य!

पुणे। भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे नेते देवेंद्रजी दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्या सारख नाहीये. त्यांना काही माहित नसतंच काय चालू आहे. आणि नंतर बोलतात की मला माहीतच नाही काय चालू आहे. देवेंजीच्या वयावर जाऊ नका. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. सोपं नाही ते खूप वर्षा नंतर अस झालं आहे. तेव्हा देखिल शिवसेनेने खूप त्रास दिला आहे. तेव्हा देखिल शिवसेनेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते की, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करायचं आणि असे प्रयत्न देखील झाले होते. असे देखील चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती

चंद्रकातदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असंही ते म्हणाले.

ते दोन नेते कोण?

पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुश्रीफांनी आता ड्रामा बंद करावा

आरोप झाले म्हणून मुश्रीफ यांनी पॅनिक होऊ नये. त्यांनी शांत डोक्याने काम करावं. कायद्याची लढाई कायद्याने लढावी. गुद्द्यावर येऊ नका. कारखान्यातील गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या कोणत्या? या कंपन्या कुठे आहेत? याची माहिती द्या. विषयांतर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. मुश्रीफांनी आता ड्रामा बंद करावा. ईडीची लवकरच नोटीस निघणार आहे, त्यासाठी एखादा चांगला वकील बघावा, असंही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडाऱ्यात झालेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, फडणवीसांची मागणी

News Desk

NCBच्या कर्मचाऱ्यांवर ड्रग्स पेडलर्सचा हल्ला, NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे जखमी

News Desk

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’, प्रहारमधुन राणेंचा ठाकरेंवर पुन्हा प्रहार!

News Desk