HW News Marathi
महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारविरोधात आक्रमक’,म्हणाले…

मुंबई | राज्य सरकाने शाळा उघडण्यास मनाई केली आहे. जरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी देखील लहान मुलांना काही होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असं म्हणत शाळा उघडण्याच्या निर्णयाचा जीआर रद्द झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, टास्कफोर्स यांनी एकत्रित बसून निर्णय जाहीर केला पाहिजे. तसं झालं तरच पालक आणि विद्यार्थ्यी यांच्यातला संभ्रम, गोंधळ दूर होईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मंत्री आणि टास्कफोर्सवर नाराज

देवेंद्र फडणवीस यांनी शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावरून सरकार आणि टास्कफोर्सवर नाराजी व्यक्त केली आहे. शाळा कधी सुरु होणार याबाबत आधीची पालक वर्गात कमालीचा संभ्रम आहे. या संभ्रमध्ये भर पाडण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

टास्क फोर्सने भीती व्यक्त केली

शाळा सुरुवर स्थगिती टास्क फोर्सने आणली आहे. “टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

“शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलं आहे. राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…” सामना अग्रलेखातून टोला

News Desk

“निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता तरी…”, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!

News Desk

‘तोपर्यंत कोणी माझ्या गळ्यात हार घालायचा नाही, फेटाही बांधू नये!’

News Desk