HW News Marathi
महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत पण…!”

मुंबई | भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे’ अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. तसंच, जर ऑपरेशन लोट्स झाले तर राज्यात भाजपचा राहणार नाही’ अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा विश्वासाही त्यांनी यावेळी व्यक्त केला. फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत देत फासा आम्हीच पलटणार, असे विधान ५ फेब्रुवारीला केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी वरील विधान केले.

“देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही,” असे नाना पटोले म्हणाले. तसेच पुढे बोलताना पटोले यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. त्यांनी “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता‌ ट्विट करता येतं. पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत क्रिकेटपटू आणि सिनेतारकांना धारेवर धरलं आहे.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं नव्हतं असं वक्तव्य करुन महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. अमित शाहांच्या या वक्तव्यावर बोलताना, “भाजप आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?, असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले,” असं वक्तव्य फडणवीस यांनी ५ फेब्रुवारीला केलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

९वी, ११वीच्या विद्यार्थ्यांना Promote करणार?, आज निर्णय होण्याची शक्यता

News Desk

‘म्याव म्याव’ करणारे लपून बसलेत, दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीकास्त्र

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना, नुकसानीची करणार पाहणी

News Desk