HW News Marathi
देश / विदेश

“देशातील कर्तृत्ववान लोकांमध्ये नारायण राणेंना संधी”– देवेंद्र फडणवीस

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून केंद्रीय मंत्र्यांच्या जनयात्रा सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनयात्रा आज(१९ ऑगस्ट) सुरु झाली आहे. या यात्रेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे’ असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं कि, ““जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे. तसंही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्याप प्रति कृतज्ञता प्रगट करुन ही यात्रा जाणार आहे,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे

“बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे. ८० टक्के उद्योग हे राणे यांच्या खात्याअंतर्गत येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्य नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झालं होतं. सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत होती, पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. ज्याप्रकार सरकारी स्तरावर वसुली सुरू आहे त्यासाठीआता संघर्षाशिवाय पर्याय नाही, जनतेसाठी संघर्षं केल्याशिवाय पर्याय नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी

Aprna

पेट्रोलने गाठली शंभरी ! ‘या’ कारणामुळे पंपचालकांनी थांबवली विक्री

News Desk

‘न खाउँगा, न खाने दूँगा’,चे काय झाले? राहुल गांधीची मोदींवर टीका

swarit