HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत प्रकरणी पार्थ पवारांनी ट्विट का केले यावर फडणवीसांनी दिले हे उत्तर

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याचे स्वागत सर्व स्तरांतून आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. आणि पुन्हा चर्चांना उधाण आले. याविषयी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही. पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरंच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं” असे फडणवीस म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे” असेही फडणवीस म्हणाले. तसेच, या आधी त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा हा निर्णय आहे आणि महाराष्ट्र सरकारने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.

“आता हा निर्णय झाल्यावर सीबीआय लवकर चौकशी करेल. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना या माध्यमातून न्याय मिळेल” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकारला नख लावणे इतके सोप्पे नाही, हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे – संजय राऊत

News Desk

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”, राऊतांनी मोदींना टोचलं

News Desk

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar