HW News Marathi
महाराष्ट्र

“हे सरकार शरजीलचं सरकार आहे का?” फडणवीसांचा प्रश्न

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सेलिब्रेटींच्या ट्विटची चौकशी होणार या मुद्यावरुन चांगलेच सुनावले आहे. आज (१० फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेलिब्रेटींच्या ट्विटची चौकशी करणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भारतरत्न मिळालेय् व्यक्तींनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, असा आरोप यावेळी फडणवीसांनी सरकारवर केला आहे. तसेच, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला किती निधी मिळाला आहे याविषयीही त्यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

दरम्यान, शरजील प्रकरणीही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधत त्यांनी महाविकासआगाडीचे सरकार शरजीलचे सरकार आहे का असा प्रश्नही विचारला आहे. तर पत्रकारांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले असता, मुंबईतील खड्डे आणि तुंबणारं पाणी यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. यासाठी भ्रष्टाचाराचे आखडे कमी यायला हवे. पैसे केवळ भ्रष्टाचारासाठी खर्च करणं थांबलं पाहिजे. त्यानंतरच मोठ्या आकड्यांचे अर्थसंकल्प सादर करण्याला अर्थ आहे, असा टोलाही यावेळी फडवीसांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही

News Desk

केंद्रानंच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा आणि संकटातून बाहेर काढावं – अजित पवार

News Desk

सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या

News Desk