HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट सरकार  

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई आज करण्यात आली होती. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेले आहे. यानंतर कंगना राणालततने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. तिने मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी केला आहे.

यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरललिकेच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार असून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे” असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. आज कंगना राणावत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाचे कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत! – संदिपान भुमरे

Aprna

केंद्राचा अर्थसंकल्प ऊर्जा क्षेत्राची घोर निराशा करणारा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 

News Desk

ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू! – सुप्रिया सुळे

Aprna