HW News Marathi
महाराष्ट्र

आज एका महिलेने सरकारला पराभूत केले आहे, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये अजूनही वाद शमला नाही आहे. हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने कंगनाची उघडपणे बाजू घेत ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कंगना भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरे सरकारवर, संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘कंगनाला राजकारणात येण्याचा रस नाही. कंगना आणि शिवसेनेत जो वाद झाला, त्याला सरकारनेच वाढवले आहे. कंगना राणावत काही राष्ट्रीय नेत्या नाही. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एका महिलेनं सरकारला पराभूत केले आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? लोकशाहीमध्ये कुणीही राजा नसतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे’, असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

‘विरोधी पक्षनेता म्हणून सरकार जिथे चुकले त्यांच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत आहोत. कोरोना काळातही आम्ही आरोप केले. राज्यात आम्ही कोणतेही ऑपरेशन लोट्स हाती घेतले नाही. एक दिवस हे सरकार स्वत: कोसळणार आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्याचा विषयच येत नाही. मुळात असे सरकार चालतच नाही. ज्या दिवशी सरकार पडले, त्यावेळी परिस्थितीनुसार, शक्य झाल्यास आणि गरजेचं वाटल्यास सरकार बनवू’ असंही फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

Aprna

महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही !, प्रविण दरेकरांचा इशारा 

News Desk

राज्यातील 3,666 ग्रामपंचायतींसाठी

News Desk