HW News Marathi
महाराष्ट्र

कृषीतज्ञ शरद पवारांचे फडणवीसांकडून कौतुक, तर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप !

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काल (८ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का?, असा माझा सवाल होता. अन्य कुठलाही उत्पादक कुठेही माल विकत असताना शेतकऱ्याला असं बंधन घालणं निश्चितच चुकीचं होतं, असं मी नव्हे, तर खुद्द शरद पवारांनीही म्हटलेलं असल्याचं सांगत फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ज्यांना शेती समजते, 10 वर्षं जे या देशाचे कृषिमंत्री होते. त्यांनीसुद्धा आधी कृषी विधेयकाला पाठिंबा दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे.

महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला. हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठे धक्का बसला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून‌ मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला, दरेकरांचा संजय राऊतांवर आरोप

News Desk

सचिन वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवीच – देवेंद्र फडणवीस

News Desk

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष!– डॉ. तानाजी सावंत

Aprna