HW News Marathi
देश / विदेश

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट!

नवी दिल्ली | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(९ ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सध्या राजकारणात भेटीगाठीचं सत्र वाढत आहे. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदले जाण्याची चर्चा देखील आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी आज( ९ ऑगस्ट) खास बैठक बोलावली आहे. याआधीच देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेलती आहे.

भाजप खासदारांची खास बैठक

भाजप खासदारांची आज(९ ऑगस्ट) दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच सोमवारी सायंकाळी सात वाजता भाजप खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व भाजप खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

बदलीच्या चर्चा फक्त मीडियात

चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावलं आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत येण्याविषयीचं कारण स्पष्ट

दिल्लीत आज(९ ऑगस्ट) भाजप खासदारांची महत्वाची भेट होणार आहे. या भेटीचं कारण म्हणजे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे !

News Desk

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रवेश खुला । सर्वोच्च न्यायालय

News Desk