HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

मुंबई | केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी केल्यानंतर देशातून, राज्यातून त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातूनही तीव्र आणि संतप्त पडसाद उमटल्यानंतर राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज (१६ सप्टेंबर) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

“कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत मी तुमच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. त्यावेळी मी कांदा निर्यातबंदी उठवण्याची आपल्याकडे मागणी केली होती. त्यामुळे कांदा निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी मी आपल्याला पुन्हा एकदा या पत्राद्वारे मागणी करत आहे, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे चांगली मिळकत होते. निर्यातबंदी घातल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असून दु:खी झाला आहे. त्यामुळे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, ही आशा आहे”, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणूक जवळ येताच CBI आणि ED कारवाई करते,” राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna

“… परंतु ७५ वर्षात झालेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे”- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

News Desk

LIVE UPDATES | मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

News Desk