HW News Marathi
महाराष्ट्र

हे तीन पाटाचं सरकार आहे, बदल्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू – देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजपने आज (२८ फेब्रुवारी) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली. सध्या राज्याची घडी एवढी विस्कटलेली आहे, की ती कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळतं आहे. अधिवेशन होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं. त्याही दरम्यान कुठलीही चर्चा होऊ नये. अशा प्रकारची रणनिती या सरकारने बनवली आहे.” अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषेदतून केली.

तसेच, “राज्याचं तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्या सुरू होतं आहे. मी तथाकथित यासाठी म्हटलं की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सगळ्यात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे.” असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

हे तीन पाटाचं सरकार आहे, बदल्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू

“खरं म्हणजे या सरकारची अवस्था अशी आहे की, तीन पाटाचं सरकार आहे. कोण कोणत्या पाटावर बसलं आहे, कोण कोणाचा पाट ओढतो आहे, हे लक्षात येत नाही. अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे. एकमेव काम या सरकारमध्ये सुरू आहे ते म्हणजे बदल्या आणि बदल्याच्या बोल्या लागत आहेत. प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून या सरकारमध्ये होताना दिसतो आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात जे कधीच घडत नव्हतं. आयएएस व आयपीएसच्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये होताना दिसतो आहे.” असा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk

ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटरच्या किमती झाल्या कमी

News Desk