HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रातून आवाहन

वर्धा | मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या खूप कमी आहे. ही टेस्टिंग वेगाने वाढवावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. फडणवीस यांनी काल (२७ एप्रिल) मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून टेस्टिंगची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्याचा पुनरुच्चार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात रोज ६५ हजारांच्यावर रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाची टेस्टिंग वाढली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून मी टेस्टिंग वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे, असं ते म्हणाले आहेत.

राज्यात लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यावर तुमची काय भूमिका आहे? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. लॉकडाऊनवर आताच काही बोलणार नाही. सरकार काय निर्णय घेतं, त्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. मात्र, लॉकडाऊनबाबत आम्ही जनतेच्या सोबत आहोत, असं सांगत लॉकडाऊनला विरोध करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे.

काय लिहिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी पत्रात?

फडणवीस यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून राज्यातील कोरोना परिस्थितीकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं. आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

 

शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतु महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री काय पाऊल उचलतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल! – नाना पटोले

Aprna

शिवसेनेने नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे! – संजय राऊत

Aprna

कर्ज मंजूरीसाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

News Desk