HW News Marathi
महाराष्ट्र

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा! 

अहमदनगर | देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आताही सवय सोडा. कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला आहे. कोपरगाव येथे 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे, असं सांगतानाच आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असं चिमटा त्यांनी काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवारांना घरातलेही गांभीर्याने घेत नसावेत,” अतुल भातखळकरांचा खोचक टोला

News Desk

राहुल गांधींविरोधात दापोलीतून तालुक्यातून याचिका दाखल!

News Desk

“हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही”, नाना पटोलेंचा सेना-राष्ट्रवादीला टोला!

News Desk