HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चाललाय!

नागपूर | राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसवाल यांची CISF च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर चालले आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे. छोट्या छोट्या कामांतही सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, असा आरोप फडणवीसांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला आहे.

“राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे” असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

“गृहमंत्र्यांकडे सुपरवायजरी (देखरेखीचं) काम आहे. पण आता बदल्या असो, छोट्या छोट्या कामांतही हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळेच अशाप्रकारे डीजीपींनी प्रतिनियुक्ती मागितली आहे. राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल” अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील जीवघेणा हल्ला, २६/११ची आठवण करून देतो !

News Desk

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

News Desk