HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी रवाना!

सातारा | राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नेते मंडळींनी या भागांना भेट देऊन तिथला आढावा घेतला. त्यानंतर आता आजपासून 3 दिवस राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेत. थोड्या वेळापूर्वी दोघेही साताऱ्याच्या दिशेनं रवाना झालेत. आजपासून तीन दिवस दोघेही सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करतील आणि स्थानिकांशी संवाद साधतील. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावापासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कोयनानगर येथील प्राथमिक शाळेतील स्थलांतरित लोकांची ते भेट घेतील. त्याचबरोबर हुंबरळी गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी ५.१५ वाजता पाहणी करणार करणार आहेत.

विरोधी पक्षनेते जव्हा जात तेव्हा शासकीय व्यवस्थापक तिथे नसतात

दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

‘पवार साहेबांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारचं आहे’

मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर

राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या पुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली होती. दरम्यान, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे उद्या (२९ जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्याच कोल्हापूर दौरा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चा रंगली आहे.

नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

दौऱ्यावर जाणं टाळा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल(२७ जुलै) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सगळ्या मंत्र्यांना आवाहन केलं आहे होता कि कोणीही पूरग्रस्त भागात दौरा करू नये. पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते 20 शाखांचे अनावरण

News Desk

मुंबईत चोरीचे प्रकरण उघडकीस, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची उल्लेखनीय कामगिरी

Aprna