HW News Marathi
महाराष्ट्र

“स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका” दिलीप-वळसे पाटलांचा मनसेला टोला

मुंबई | राज्य सरकारच्या नियमांना पायदळी तुडवून काल(३१ ऑगस्ट) मनसे कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला. यावरून आता त्यांच्यावर सरकारकडून टीका केली जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी देखील मनसेवर निशाणा साधला आहे. लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये

दिलीप वळसे-पाटील यांनी मनसे पक्षावर हल्ला केला आहे. ते म्हणाले, ” सर्व जगात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट आली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये, असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं आहे.

सहकार कायद्याने काय परिणाम होणार?

सहकार कायद्याने काय परिणाम होणार? याबाबत आज चर्चा झाली. सहकार कायद्याने होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एक विचार गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, असं ते म्हणाले आहेत.

स्टुलावर उभं राहून फोडायची का?

राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले आहेत.

राज्य सरकारने दहीहंडी साजरा करू नये असं सरकारने बजावलं आहे, परंतु मनसे कार्यकर्त्यांनी हे नियम झुगारून हंड्या फोल्डया आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीवरुन पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टोलबाजी केली. जसे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते मोजत नाहीत, तसेच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही, म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का?

राज ठाकरे यांनी सरकारवर निर्बंधांवरून हल्ला चढवला आहे. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली आहे.

मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का?

राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार! – मुख्यमंत्री

News Desk

…तर अधिकाऱ्यांना शॉक देणार, मनसेचा इशारा!

News Desk

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

Aprna