HW News Marathi
महाराष्ट्र

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

मुंबई | सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा आभाळ कोसळले आहे. मध्यमवर्गीयांचे जीवन आणि त्यांची व्यथा मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे आज (४ जून) वृद्धाकाळाने निधन झाले. दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.

“दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. दुपारी २ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. इंडस्ट्रीचं हे सर्वांत मोठं नुकसान आहे. तुमची खूप आठवण येईल,”, अशा शब्दांत त्यांनी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी, छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, मनपसंद, हमारी बहु अलका, उस पार, प्यार का घर अशा अनेकविध चित्रपटांचे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शन केले होते.चटर्जी यांनी हिंदीसोबत बंगाली चित्रपटही दिग्दर्शित केले होते. त्यांचे चित्रपट अधिक वास्तववादी समजले जात. ७० च्या दशकात अ‍ॅक्शन चित्रपटांचे युग असताना बासू चटर्जी यांचे सिनेमे सर्वार्थाने वेगळे ठरले. दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांनी छोटी सी बात, रजनीगंधा आणि चितचोर यासारख्या चित्रपटांचे सोने केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या २६ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करणार

Aprna

जगात सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी असलेल्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा राज्याला अभिमान – अजित पवार

News Desk

मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे – मुख्यमंत्री

News Desk