HW News Marathi
Covid-19

“डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?”-भाजपचा सवाल

मुंबई | एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की मी आता राज्याची गरज लक्षात घेऊन काम करत आहे. आरोग्य मंदिरे बंद करून देवांची मंदिरे उघडू का? मुख्यमंत्र्यांच्या याच उत्तराला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. “राज्याला संबोधून मुख्यमंत्री म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पबबाबत आपण काही बोलणार आहात का याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे”, असा सणसणीत टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही खोचक सवाल केले.

बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात

“कट कमिशन आणि वाटाघाटी हा ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरणं समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत.

मॉलमधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत, मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्यांचं पोट भरु शकत नाही का?”, असा सवाल त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने आज घेतले ३ अत्यंत महत्त्वाचे निर्णय

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात दाखल होणार

News Desk

गेल्या २४ तासात सर्वाधिक ८,९०९ रुग्णांची नोंद, तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk