HW News Marathi
महाराष्ट्र

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

मुंबई । यावर्षी देशात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, यंदा पाऊस ७ ते ८ दिवस उशीराने धडकणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातही पावसाचे आगमन उशिरा होणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करु नये, पेरण्या उशिरा करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीला आहे. आज (७ जून) मुंबईत मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की पेरण्या उशीरा करण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी तब्बल ५ कोटी शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहे.

खरीपाच्या योजनेविषयी देखील यावेळी आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ७३ टक्के पाऊस झाला होता. मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे ३८ ते ४० टक्केच पाऊस पडला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षी खरीपाचे नियोजन केले आहे असेही मुख्यमंत्र्याणी सांगितले. गेल्या पाच वर्षातील गुंतणुक पाहील्यास त्यामध्ये चार पटीने वाढ झाली आहे. साधरणपणे ५५ ते ६० टक्के क्षेत्र सोयाबीन आणि कापूस या पीकाखाली आहे अशीही माहीती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांसह महसुल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर, तीन दिवस सुरु रहाणार संप

News Desk

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

News Desk

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३२०२,कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी । राजेश टोपे

News Desk