HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…मकरसंक्रांतीच्या सणाची कथा

फार वर्षांपूर्वी लोकांना त्रास देणारा एक संकारसुर नावाचा राक्षस होता. त्याला ठार मारणे आवश्यक असल्याने देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संकारसुराला ठार मारून सर्व लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. थंडीच्या दिवसात तिळाला फार महत्व दिले जाते. तिळामुळे अंगात उष्णता निर्माण होते, त्याचबरोबर बाजरीची भाकरी, गाजर, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी यांसारख्या शक्तिवर्धक पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करून उष्णता मिळवली जाते.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.

आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीसाठी शेतकरी – प्रहार संघटनेची आसुड यात्रा

News Desk

इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही, खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही – निलेश राणे

News Desk

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

News Desk