HW News Marathi
महाराष्ट्र

‘माझा वाढदिवस साजरा करू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

रत्नागिरी। राज्यात पूर आणि कोरोना महामारी हे दुहेरी संकट ओढवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज(२५ जुलै) चिपळूण दौरा पूर्ण झाला आहे. तिथे त्यांनी त्यांच्या समर्थकांना ‘माझा वाढदिवस साजरा करू नका’, असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्त चिपळूण भागाला भेट दिली. चिपळूणमध्ये पूरामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहेत. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच व्यापाराच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीवर महाराष्ट्र शोक व्यक्त करत आहे. त्यामुळे यावर्षी कोणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

निसर्ग कोपला आहे

मुख्यमंत्री सध्या पूरग्रस्थ भागांची पाहणी करत आहेत. चिपळूणमधली पाहणी पूर्ण करून ते उद्या(२६ जुलै) पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. या वेळी ते म्हणाले, ‘“कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांला यामुळे इजा झाली आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये किंवा पोस्टर्सही लावू नये. सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यास, ते आपण स्वीकारणार. महाराष्ट्रावर अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असताना संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अजूनही कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे, यामुळे कोणीही वाढदिवसाचे कुठलेच जाहीर कार्यक्रम करू नये.”

मुख्यमंत्री सहायता निधीत सर्वांनी योगदान करावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलैला आहे. आपली लाडक्या नेत्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. “यावेळी पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. आताचे दोन्ही संकट लक्षात घेता वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीत सर्वांनी योगदान करावे, तसेच सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे.” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेला केली आहे.

लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत उद्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र त्यांचा दौरा असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तात्काळ मदत केली जाईल असं दुर्घटनाग्रस्त नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही, कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांचा अंदाज घेऊनच सरकार मदत करेल आणि आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

News Desk

बीएमसीच्या पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेचा विजय

News Desk

शेतकऱ्याची अजब मागणी! २ एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या… अन्यथा….

News Desk