HW News Marathi
महाराष्ट्र

“संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नका”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


मुंबई। राज्यातील ठाकरे सरकार अर्थातच महाविकास आघाडी सरकार ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात दोन वर्षे पूर्ण केली आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार असं वक्तव्यं केलं. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार करत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं वक्तव्य केलं आहे की सरकार जाईल. त्याची आपल्याकडे नोंद आहे. राऊतांच्या या टीकेबाबत विचारलं असता आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेचे जेष्ठ नेते असलेले संजय राऊत याच्यावर टीकेचे बाण सोडले.

रोज सकाळी कॅमेऱ्यासमोर उभं राहून…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. तर याच मुलाखतीत संजय राऊतांबाबत विचारलं आणि, फडणवीस म्हणाले की, ‘संजय राऊतांचं काय आहे, ते मनात आला तो आकडा सांगतात. संजय राऊतांना तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका. या सरकारने काही लोक असे नियुक्त केले आहेत की त्यांना कामच असं आहे की रोज सकाळी कॅमेऱ्यासमोर उभं राहून जनतेच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी, महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींकडून नरेटीव्ह दुसरीकडे न्यायचा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याची चर्चा हे करतात. तुम्ही मला सांगा संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांबाबत बोलले का? एकदा तरी अतिवृष्टीवर बोलले का, एकदा तरी पुराबाबत बोलले का, एकदा तरी विजेचे कनेक्शन कापले जात आहेत त्यावर बोलले का एकदा तरी गावं अंधारात आहेत त्यावर बोलले का, आत्महत्या होत आहेत त्यावर बोलले का? यावर फडणवीस यांनी टीका केली आहे.

अशी सरकारं फार काळ चालत नाहीत

राज्यातील ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्याने विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस म्हणालेत, बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – उद्धव ठाकरे

Aprna

अखेर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले ‘हे’ वचनपूर्ण केले

News Desk