HW News Marathi
महाराष्ट्र

कृषीराज्यमंत्र्यांच्या अंगावरच फवारले औषध

यवतमाळ: फवारणी करताना १९ शेतक-यांचा बळी गेला असून शासनाने या शेतक-यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्याच अंगावर एका शेतकरी नेत्याने औषध फवारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सिकंदर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सिकंदर शहा हा शेतकरी वारकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते.

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीने १९ शेतकºयांचा मृत्यू झाला असून विषबाधेमुळे अनेकांना अंधत्व आले आहे. ७५० हून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत. कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडीच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशक फवारणी केली जात होती. यवतमाळमधील या घटनेनंतर शेतकरी संघटनांनी कृषी विभागातील अधिकाºयांवर टीका केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला होता.

कीटकनाशक फवारणीप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी यवतमाळमध्ये आले होते. यादरम्यान त्यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला. पोलिसांनी फवारणीचा प्रयत्न करणाºया सिकंदर शहाला ताब्यात घेतले आहे. कीटकनाशक फवारणीमुळे एवढ्या शेतकºयांचा मृत्यू झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सिकंदर शहाचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

Aprna

उस्मानाबादत बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक- दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Aprna

सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही! – मुख्यमंत्री

Aprna