HW News Marathi
महाराष्ट्र

अंजनी ते चिपळूणदरम्यान रुळावर माती वाहून आली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | गेल्या आठ दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे आज (14 जुलै) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास अंजनी ते चिपळूणदरम्यान रुळावर माती वाहून आली. यामुळे गेल्या दोन तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळती झाली आहे.

दरम्यान, मुंबईहून येणारी मुंबई -मडगाव-मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकात थांबली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत खेड रेल्वे स्थानकात तिकीट विक्री थांबवली आहे. कोकणातील डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाल्यामुळे पाण्याबरोबर माती वाहून आली आहे. कोकणातील चिपळूण आणि खेड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तर वाशिष्ठी आणि जगबुडी नदी भरुन वाहत आहेत.

राज्यात मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यात हवामान विभानाने  रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस कोकणासह राज्यातील अन्य जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्ता वर्तवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, सचिन सावंतांचा गंभीर आरोप

News Desk

संभाजीराजे, नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही! – चंद्रकांत पाटलांचा सल्ला

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतींना अभिवादन!

News Desk