HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून विधान परिषदेसाठी डच्चू ; तर पंकजा मुंडे म्हणतात…


मुंबई। सध्या राज्याचे राजकारण हे ढवळून निघालेल आहे. कारण भाजपकडून आता विधान परिषदेसाठी चार उमेदवार हे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. आणि या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेल्या दोन नेत्यांची वर्णी लागली आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांना आता पुन्हा डावलण्यात आले आहे. म्हणून पंकजा मुंडे नाराज आहेत का या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याबाबत आज पत्रकार परिषद घेत स्वतः पंकजा मुंडे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. की, मला कसलीही अपेक्षा नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

मला कसलीही अपेक्षा नाही

या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्याकडून ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवण्यात आला आहे. मला कसलीही अपेक्षा नाही. पदामुळे परिणाम होईल असं वाटत नाही. माझं काम सुरू आहे, असं पंकजा मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की आता अधिवेशन येत आहे. त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कालावधी ठरवून घेतला पाहिजे. सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायलाच हवा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी, असा सल्ला देखील हातात यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत

त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, ‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.

‘बीड रेल्वेला राज्याकडून मदत नाही’

सर्वसामान्य नागरिकांनी या सरकारच्या कामगिरीवर डोळा ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी. बीडच्या रेल्वेला राज्य सरकारकडून मदत नाही. केवळ 19 कोटी राज्य सरकारनं दिले. केंद्राने भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारनं वाटा दिला तर 2024 पर्यंत रेल्वे येईल. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केले” – नवाब मलिक

News Desk

गॅस दरवाढीवरुन ‘मविआ’चे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी

Aprna

केंद्र सरकार महाराष्ट्राला दाबाण्याचा प्रयत्न करत आहे, रेल्वे सुरु करण्यावरुन आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया!

News Desk