HW News Marathi
महाराष्ट्र

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई न मिळल्यास आंदोलनाचा इशारा – उद्धव ठाकरे

मुंबई | ‘पंचनामे आणि सर्वेक्षण इत्यादी सरकारी सोपस्काराच्या जंजाळात फार न अडकवता बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल, याचा विचार आता राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांनी करायला हवा,’ असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटले आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे असे आदेशही ठाकरेंनी दिला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या २ दिवसात विदर्भ-मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

कर्जमाफी ते कोविड विषयक नियोजनापर्यंत प्रत्येक आपत्तीला राज्य सरकारने धैर्याने तोंड दिले अन विरोधक मात्र चुका काढत राहिले!

Aprna

वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवत मलिकांचा पुन्हा गंभीर आरोप

News Desk