HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणार” – नितीन राऊत!

नागपूर। गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर आलेला असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणाच नितीन राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.गणेशोत्सव पर्व शांततेत पार पडावा म्हणून नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज पोलीस जिमखाना येथे बैठक पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित होते. तर बैठकीला आभासी पद्धतीने खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार विकास ठाकरे देखील हजर होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार

सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली.

सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत

यावेळी राऊत यांनी गणेश मंडळांचे कोरोनाच्या संकटाकडेही लक्ष वेधले. डेल्टा प्लस वेरीएंटचा शिरकाव शहरात झालेला आहे. पुढील 15 दिवस धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही स्थिती विचारात घेऊन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत. तसेच राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : राज्यात १५०४ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

News Desk

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

News Desk

अक्कलकोटमध्ये हनुमानाची ध्यानधारणा

News Desk