HW News Marathi
महाराष्ट्र

संचारबंदीची ऐशीतैशी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या संपर्क कार्यालयावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जालना | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आल्या. मात्र, यावेळी संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. जन सामन्यांना संचारबंदीचे पाठ शिकवणारे पोलिस प्रशासन यावेळी सपशेल झोपेत असल्याचे दिसून आले. याठिकाणी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केलेली होती. यामुळे ‘ सोशल डिस्टन्स ‘ बोजवारा उडाला.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉक डाऊन करण्यात आल्याने संचारबंदी लागू आहे.त्यामुळे जन सामन्यांची उपासमार होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने अशा गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट शनिवारी (४ एप्रिल) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. वास्तविक पाहता संचारबंदी आणि जमावबंदी लागू असताना गरजूंना त्यांच्या घरी या किट नेऊन देणे अपेक्षित असताना नागरिकांना संभाजीनगर येथील भाजप कार्यालयासमोर बोलावण्यात आले होते. त्यामुळे याठिकाणी शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलांनी देखील तोबा गर्दी केली.

यामुळे ‘सोशल डिस्टन्ससिंग ‘ चा बोजवारा उडाला होता. त्याच बरोबर जमावबंदी आणि संचारबंदीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पोलिसांकडून सर्व साधारण नागरिकांना संचारबंदीचा पाठ शिकवला जातो. त्यांना मारहाण केली जाते. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या पत्रकार, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार आदींना पोलिसांकडून मुद्दामहून त्रास दिला जातो. मात्र, भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीने सर्रासपणे संचारबंदी ची पायमल्ली केल्यावर पोलिसांचे हाथ बांधले का जातात, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांचा यांना मोबाईल स्विच ऑफ येत होता.

कोरोनाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण ?

भाजपच्या कार्यालयासमोर जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाच्या निमित्ताने शेकडो नागरिकांना बोलावण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशाची पायमल्ली भाजपनेच केल्याचे दिसून आले आहे. या गर्दीमुळे कोरोना व्हायरस साठी पोषक वातावरण निर्माण झाले. या विषाणूंचा संसर्ग वाढला तर यासाठी प्रशासन कोणाला जबाबदार धरणार आहे ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या शिपाई पदासाठी इंजिनिअर आणि डॉक्टरांचे अर्ज

News Desk

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार!

News Desk

तन्मय फडणवीस चुकलाचं! अमृता फडणवीस काकींनी ट्विट करत केली कानउघाडणी

News Desk