HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपच्या माजी मंत्र्याकडून झालेल्या घोटाळ्याचे पुरावे लवकरच देणार” – नवाब मलिक

मुंबई। राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून परिचित झाले, कारण आर्यन खान प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका नवाब मलिक यांनी सुरू केली आणि राज्याच्या राजकारणात वाद पेटला. रोज नवनवीन पत्रकार परिषदा आणि रोज नवनवीन खुलासे करत असतात आणि अश्यातच आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्टसंदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर त्यांनी आपल भाष्य केल आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर काढणार आहे, असं सूचक वक्तव्य नवाब मलिक यांनी केल आहे.

ईडीच्या लोकांना आवाहन

पुढे नवाब मलिक बोलताना असे देखील म्हणाले की, माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं. पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन भूमिका स्पष्ट करावी असा सल्लाच आता नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आला आहे. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही बातम्या प्रसिद्ध करुन तुम्ही बदनामी करु शकत नाही. आपल्या वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. तर वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असल्याचं वक्तव्य देखील मलिक यांनी केल.

प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाणार

भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिर मज्जित, दर्गाह यांच्या नावाने जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं मी आता बाहेर काढणार आहे असे देखील नवाब मलिक म्हणाले. रोज नवनवीन खुलासे करून नवाब मलिक राज्यातील घोटाळे बाहेर काढता येईल आणि आज देखील अशाच प्रकारे नवीन गौप्यस्फोट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कडून करण्यात आला आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाणार आहे, आता नवाब मलिक यांनी पुन्हा हे नवीन आव्हानच विरोधकांना केले. याबरोबरच केंद्र सरकारनं कंगणाला जो पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. परत घ्यावा अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली, तिच्या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध करतो. आणि अभिनेत्री कंगना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर सुनावणी

News Desk

मुंबईत बॉम्बस्फोट कट प्रकरणी एटीएसकडून आणखी एकाला अटक!

News Desk

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk