HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर पुढची दिशा काय असेल यावर ॲड.असिम सरोदे यांची Exclusive माहिती!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात धुमश्चक्री सुरु आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला जोडो मारले तर कुठे शाईफेक केली. इतकंच नाही तर नाशिक आणि ठाण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केली. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, असं टोकाचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड, महाड, नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर महाराष्ट्रभर विविध ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तर या सगळ्या प्रकरणावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी एच डब्ल्यू न्यूज मराठीशी संवाद साधल्यावर कोणत्या कलमाअंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होऊ शकते या सगळ्या वर स्पष्टीकरण दिले.

कायदेतज्ञ असिम सरोदे काय म्हणतात?

नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले त्यासंदर्भात दखलपात्र स्वरूपाचे आहे. आणि त्यातला महत्त्वाचा 153 बी मध्ये एखाद्या वक्तव्याच्या आधारे तेढ निर्माण करने, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करने आणि यात तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा देखील होऊ शकते अशी माहिती कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी एच डब्ल्यू न्यूज मराठीशी बोलतांना दिली आहे. तर पुढे बोलताना ते असेही म्हणाले सरकारी काम करणाऱ्या माणसाला अशी धमकी देणे किंवा तशा प्रकारची शक्यता निर्माण करणं यासाठी 189 हे कलम लावण्यात आले आहे.

तर सार्वजनिक शांततेचा भंग केल्यास 159 हे कलम लावलेलं आहे. किंवा जाणीवपूर्वक अपमान करणे याला 104 हा कलम लावण्यात आला आहे. या सगळ्या कलमांची माहिती घेतली तर पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असे देखील सरोदे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना संरक्षण असतं का?

नारायण राणे हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत, आणि ते ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या संदर्भात त्यांनी विधान केलं असतं किंवा वक्तव्य केलं असतं, किंवा कामकाजाचा भाग म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला असता, किंवा कामकाजाबद्दल एखाद्या मंत्र्यावर आरोप केले असते त्यावेळी त्यांच्यावर त्या मंत्र्यांनी गुन्हा दाखल केला नसता. मात्र नारायण राणे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण आहे. कारण अनावश्यकपणे राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल वक्तव्य केलंय, ते असभ्यतेचं वक्तव्य आहे. सद्सद्विवेक बुद्धीने जे बोलले त्यांना संरक्षण आहे. जाहीरपणे अनावश्यक त्यांनी व्यक्त केलेलं आहे. संसदेमध्ये एखादं काम सुरू असतं तेव्हा, सध्या त्याचे नियम आहेत. संसदीय भाषा अस आपण त्याला म्हणतो. तर संसदीय भाषाकोश देखील निर्माण करण्यात आले आहेत. आणि संसदेने एखाद्या वक्तव्य केले असेल तर ते विशेष अधिकारांच्याखाली संरक्षण आहे. मात्र संसदेच्या बाहेर अशी वक्तव्य केली तर त्याला संरक्षण नाही, मी केंद्रीय मंत्री आहे म्हणून मला काही करू शकत नाही हे आपल्या कोणाच्याच बुद्धीला पटत नाही. मात्र ते कायद्यात सुद्धा मान्य नाही असे देखील कायदेतज्ञ असिम सरोदे यांनी स्पष्ट केले.

नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर पुढचे पर्याय कोणते आहेत?

गुन्ह्याची व्याप्ती आणि खोली हे पाहिलं तर त्यांनी केलेले वक्तव्य हे, जामीन न देण्यासारखं नाहीये, त्यांना जामीन दिला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे असं असिम सरोदे म्हणालेत. एका न्यायालयाने जामीन फेटाळला असेल तरी देखिल उच्च न्यायालयाकडून जामीन जरूर मिळू शकतो. पण सरकारने त्यांना अटक केली तर, नारायण राणेंना काही दिवस अटकेतच राहावं लागू शकत. मात्र नारायण राणेंना जामीन भेटण्याची शक्यता शंभर टक्के आहे.

अटक झाल्यानंतर कशा प्रकारे वागणूक मिळू शकते?

पोलिसांनी त्यांना अटक जरी केलं तरी देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांना देखील वागणूक दिली जाते. त्यानुसार सामान्य वागणूक द्यावी लागेल. नारायण राणेंच आत्तापर्यंत कर्तुत्व जर पाहिलं तर त्यांना लगेच कोणतीही हीन दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु अटकेच राजकारण नेहमीच होतच असत. परंतु अटक केल्यानंतर माझ्यावर अत्याचार झाले असे आरोप होऊ शकतील, कारण त्या स्वरूपाच हे राजकारण आहे. आणि त्याची दिशा देखिल तशीच जात आहे असं देखिल कायदेतज्ज्ञ असिम सरोदे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

News Desk

पुणे मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा !

News Desk

राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk