HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तापमानात कमालीची वाढ, अमरावतीत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

मुंबई । राज्यातील थंडी आता पळाली आहे. तिची जागा आता कडक उन्हाच्या झळांनी घेतली आहे. राज्यात सोमवारपासून (२५ मार्च) उष्ण वारे वाहू लागले असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी देखील तापमान चढेच राहिले आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले होते. तर मंगळवारी (२६ मार्च) मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे. शहरातील उकाडा अचानक वाढल्याने मुंबईकर बेहाल झाले आहेत. मंगळवारी अमरावतीत ४२.६ अंश सेल्सियस म्हणजेच राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईसह मुंबईच्या जवळपासच्या परिसरात बुधवारी (२७ मार्च) आणि गुरुवारी (२८ मार्च) आकाश निरभ्र राहणार आहे. या दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २४ अंश सेल्सियसच्या जवळपास असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

News Desk

मुंबईतून हुसकवलेले फेरीवाले कल्याण डोंबिवलीत

News Desk

यशवंत जाधव मुंबईतील जुन्या पघडीच्या ३६ इमारती विकत घेतल्या! – किरीट सोमय्या

Aprna