HW News Marathi
महाराष्ट्र

लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक, दोन गटात हाणामारी

औरंगाबाद | मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलावारी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली.

जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे जमावाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी असून 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी केली आहे. तर औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, – अमोल कोल्हे

News Desk

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचे नामांतर होणारच – संजय राऊत

News Desk

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Aprna