HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“गारपीठीने शेतकरी आडवा झालाय…”; पंचनामे न करण्यावरून अजित पवार आक्रमक

मुंबई – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशातच “९५ टक्के शासकीय कर्मचाऱ्यांकडे हरामचा पैसे आहे”, असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. दरम्यान, यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं

“सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे, अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले.

“गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी अडचणीत आले आहेत आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.

राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, “तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत”, असे आवाहन अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले. तसेच, काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेस-भाजपमध्ये ट्विटरवर काव्यात्मक जुगलबंदी

News Desk

ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी पुन्हा एकदा डागली मोदी सरकारवर तोफ

swarit

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”, भाजपचा सवाल

News Desk