HW News Marathi
महाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा

मुंबई | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू मोर्चा काढला होता. मात्र, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा हा मोर्चा राजभवनावर काढला होता. परंतु, हा मोर्चा राजभवनावर पोहचण्याआधीच पोलिसांनी अडवला. बच्चू कडूंना यांच्यासह आंदोनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

तसेच सत्ता स्थापनेच्या गोंधळामुळे प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला. म्हणून बच्चू कडू यांनी हा मोर्चा काढला असल्याचे सांगितले. या मोर्चात मोठा संख्येने शेतकरी सहभाग झाले होते. या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, सडलेले कांदे रस्त्यावर फेकले.

त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती. राजभवनाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

swarit

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk