HW News Marathi
महाराष्ट्र

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

निपाणी | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात शनिवारी (५ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारच्या समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जण जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील जमादार कुटूंबीय बेळगावकडे निघाले होते. तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जमादार कुटूंबिय असलेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकने या कारला १०० फूट अंतर फरफटत नेले. या अपघातात मृत झाल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

हा अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळावर बेळगाव पोलीस दाखल झाले असून बेळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक सुधीरकुमार रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पूंज लॉईडचे कर्मचारी दाखल झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

swarit

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता मोदींच्या कानमंत्रावर चालतो ,राज्यपालांचा गौप्यस्फोट!

News Desk