HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर ठरलं! महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना 7:30 वाजेला भेटणार!

मुंबई। राज्यपाल नियुक्त 12 आमदाराची यादी गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते आज (1सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची संध्याकाळी 6 वाजता भेट घेणार आहे.१२ आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टाने हा निर्णय लवकर घेतला पाहिजे, असं मत नोंदवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट घेण्यासाठी आमंत्रण पाठवलं.

12 आमदारांचा मुद्दा मार्गी लागेल का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राजभवनावर जाणार आहे. यावेळी राज्यपालांसोबत 12 आमदारांच्या यादीवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.मागील आठवड्यात 26 तारखेला ही भेट होणार होती. मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण राज्यपाल चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेले होते. दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर ते उत्तराखंड इथं गेले होते. उत्तराखंडाचा दौरा करून आल्यानंतर राजभवनाकडून भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला आमदारांचा मुद्दा मार्गी लागतो का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

तो प्रस्ताव राज्यपालांना दीर्घकाळ प्रलंबित ठेवता येणार नाही – हायकोर्ट

राज्यपालांना कोणताही आदेश देणार नाही, असे स्पष्ट करताना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबतचा प्रस्ताव दिर्घकाळ प्रलंबित ठेवता येणार नसल्याची टिप्पणी मुंबई हायकोर्टाने गुरुवारी केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने आपले मत स्पष्ट केले. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. मात्र, मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत. राज्यपालांनी १२ आमदारांचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळावा अथवा तो संमत करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीतील नेत्यांची राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यासोबत भेट होणार का? की पुन्हा रद्द होणार? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना दिलासा! १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

‘अजित पवारांनी पुण्याची वाट लावलीय’, निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्ला

News Desk

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

News Desk