HW News Marathi
महाराष्ट्र

तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकार करणार २५० कोटींची मदत

मुंबई | तौक्ते चर्कीवादळग्रस्तांना ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे. या चक्रीवादळ ग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णयही उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळावेळी काढण्यात आलेला शासन निर्णय याही वादळाच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आला आहे.

तसेच, एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

दम्यान, या नुकसान भरपाईबद्दल विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले..दिली का? का नाही दिली अजून…भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल नारायण राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का?”, नितेश राणे संतप्त

News Desk

एका पोलिसामुळे सरकारला फरक पडत नाही ! पवारांनी काढली भाजपची हवा

News Desk

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

News Desk