HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत

मुंबई | चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल (शुक्रवार, 20 मे) रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून संबंधितांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

चंद्रद्रपूर-मूल मार्गावर झालेल्या या अपघाताची भीषणता थरकाप उडवणारी होती. पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारा टँकर आणि लाकडे नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेनंतर रस्त्यावर फक्त आगीचे लोट दिसत होते. या आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह ओळखणे सुद्धा कठीण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी आणि प्रशासनाने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बिलकूल दाद दिली नाही’, अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

News Desk

निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढणाऱ्या रत्नागिरीच्या उमेदवारवर गुन्हा दाखल

News Desk

उद्धव ठाकरेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

News Desk