HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीतल्या पूरग्रस्त महिलांनी अजित पवारांजवळ मांडल्या व्यथा…!

सांगली। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी आता पूरग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू केलाय त्यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. तसंच त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत मदतीचं आश्वासन देऊन धीर दिला आहे.

आमचं पुनर्वसन करा असं सांगितलं

सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी अजित पवार यांनी केली. यावेळी पूरग्रस्त महिलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी आमचं पुनर्वसन करा असं सांगितलं. यावर अजित पवार यांनी तुमचं पुनर्वसन करू असे आश्वासन या दुर्घटनाग्रस्त भागातल्या नागरिकांना दिले आहे.

पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा

भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली.

उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक

तसंच खराब हवामानामुळे मी कोल्हापूरला जाऊ शकलो नाही. कोरोनाच्या काही संबंध येत नाही. हेलिकॉप्टर उड्डाण घेत नसल्यानं मी कोल्हापूर दौरा रद्द करुन सांगलीला आलो. येथे पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक असून त्या बैठकीत या सर्व परिस्थितीचा आढावा मांडून आम्ही योग्य तो निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. या पाहणीदरम्यान अजित पवारांसोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी उपस्थित होते.

बचावकार्य करणारी बोटचं पाण्यात अडकली

पाऊस होता त्यामुळे मी बायरोड सांगलीला आलो. सांगलीची पाहणी आणि बैठक करून साताऱ्याला जाणार. साताऱ्याची पाहणी आणि बैठक करून पुण्याला जाणार. पण तोपर्यंत हेलिकॉप्टर मिळालं आणि प्रशासनाने परवानगी दिली तर कोल्हापूरलाही चक्कर मारेल. कारण कोल्हापूरचा रस्ता अजूनही बंद आहे. पुलावरून पाणी ओसरलं आणि जाण्यासाठी मार्ग मिळाला तर जाईन. मी सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो, असं अजित पवार म्हणाले. सांगलीत बचावकार्य करणारी बोटचं पाण्यात अडकली असल्याची घटना घडली आहे. बचाव कार्य करत असताना महापालिकेच्या बोटीचे पात तुटल्याने बोट पाण्यातच अडकली. लाकडी ओंडक्यामुळे बोटीचं पात तुटलं त्यानंतर ही घटना घडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

News Desk

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Aprna

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk