HW News Marathi
महाराष्ट्र

विलासरावांनी महाराष्ट्रातल्या दूधाचा प्रश्न अमेरिकेतुन सोडवला होता !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची आज जयंती. विलासरावांच्या जाण्याने राजकीय पोकळी निर्माण झाली.आज त्यांच्या जयंती निमित्ताने जाणून घेऊया विलासरावांची राजकीय सुरूवात आणि त्यांचा एक किस्सा !

राजकीय सुरूवात कशी झाली ?

ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून काम केलेले अनेक नेते पुढे राज्य व केंद्राच्या राजकारणात शिखरावर पोहचले. अशा काही मोजक्या नेत्यांच्या यादीत माजी मुख्यमंत्री दिवगंत विलासराव देशमुख यांचे नाव आवर्जून घेतलेच जाते. एलएलबीचे शिक्षण पुर्ण करून लातूरमध्ये वकिली करणाऱ्या विलासरावांच्या राजकारणाला ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरुवात झाली. वकिली करत असतांना निवडणुका लागल्या आणि विलासराव त्यांचे बंधु दिलीप या दोघांनी एकाच वेळी बाभळगांवची ग्रामपंचायत निवडणूक लढवली. दोघेही निवडून आले आणि विलासराव देशमुखांना सरपंच पदाचा मान मिळाला. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा बाभळगावला एक वकील सरपंच म्हणून मिळाला होता.

महाराष्ट्रातल्या दूधाचा प्रश्न विलासरावांनी अमेरिकेतून सोडवला

विलासराव देशमुख हे एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. राजकीय क्षेत्रात असताना देखील त्यांनी प्रत्येकांशी वैयक्तिक पातळीवर आपलं नातं जपलं. म्हणूनच विलासराव हे फक्त नेते राहिले नाही तर लोकनेते झाले.

लोकनेता कसा असतो हे त्यांनी वारंवार दाखवून देखील दिलं आहे. याचंच एक छोटं उदाहरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलं होतं. विलासराव देशमुखांना आदरांजली वाहताना राजू शेट्टी यांनी त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला होता.

विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी राजू शेट्टी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात ते असं म्हणाले की, ‘२ जुलै २००७ रात्रीचे २ वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरीकेत आहे. उद्या आर आर यांचेशी दुध दरासंदर्भात चर्चा करून आंदोलन मागे घ्या मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि घेतला सुध्दा. आज तुमची अनुपस्थिती जाणवते. स्व.विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.’

महाराष्ट्रात दुधाचा प्रश्न चिघळू नये यासाठी थेट अमेरिकेतून फोन करत विलासराव यांनी दरवाढी संदर्भातील निर्णय घेतला होता. याचीच आठवण राजू शेट्टी यांनी काढली होती.

त्यामुळे विलासराव देशमुख यांना असलेली प्रश्नांची जाण,त्यातून त्यांनी मार्ग काढण्यासाठी केलेलं प्रयत्न याचं इतर पक्षातले नेतेही कौतुक करत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”-चंद्रकांत पाटील

News Desk

“शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले!” अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

News Desk

कागदी घोडे नाचऊ नका ! -खा.अशोक चव्हाण 

News Desk