HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पुन्हा धक्का!; ईडी कोठडीत ३ दिवसांची वाढ

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सेशन्स कोर्टाने हा निर्णय दिला आहे. यामुळे आता देशमुखांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहेत. देशमुखांच्या ईडी कोठडीची मुदत ६ नोव्हेंबरलाच संपली होती. मात्र, ईडीनं देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले होतं. तसेच सेशन्स कोर्टात आज (१२ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत सेशन्स कोर्टानं देशमुखांच्या कोठडीत वाढ केली आहे.

देशमुखांनी कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान एक पत्र दिलं. यात मला ईडी रिमांडमध्ये १० दिवसपूर्ण झालं असून २०० हून अधिक प्रश्न देखील विचारून झालं. आता माझ्याकडे ईडीला सांगण्यासारखं काही नसून आता माझ्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ होऊ देऊ नका, अशी विनंती देशमुखांनी कोर्टात म्हटलं.

नेमकं काय आहे प्रकरण

मुंबईमधील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपयं वसूल करण्यात यावे, अशा आदेश देशमुखांनी दिला होता. या वसुलीची जबाबदारी देशमुखांनी सचिन वाझेंवर सोपवली होती, असा आरोप मुंबईचं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि या प्रकरणाची दखल सीबीआय आणि ईडी घेऊन देशमुखांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यानंतर ईडीनं देशमुखांना ५ वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. दरम्यान, देशमुख हे त्यावेळी अज्ञातवासात गेले होतं, यानंतर काही दिवसांपूर्वी देशमुख मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”, तुषार भोसलेंचा सरकारला सवाल

News Desk

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् योजना; राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सादर

News Desk

सांगा पालकमंत्री गेले कुणीकडे? राम कदमांचा सरकारला सवाल

News Desk