HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीनं राज्यशासन घेणार मोठा निर्णय- अजित पवार

पुणे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२जुलै) ला पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या अश्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांनी राज्यासह पुणे शहरातल्या कोरोना परिस्थिती संदर्भात महत्वपूर्ण मुद्दे यावेळी मांडले.पत्रकारांशी बोलताना पवारांनी यावेळी प्रतिक्रिया दिली की कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही, त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणलेली असली तरीही नागरिकांनी गाफील न राहता नियमांचं पालन करावं अशी आग्रही भूमिका पुण्याच्या पालकमंत्र्यांनी मांडली.

वैद्यकिय महाविद्यालयांबाबत राज्य शासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळं राज्यात शाळा आणि महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद असून, ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. अशा परिस्थितीत वैद्यकिय महाविद्यालयं सशर्त सुरु करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात असल्याचं अजित पवार म्हणाले.

वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेशाची मुभा देत महाविद्यालयं सुरु करण्यासाठी राज्यात सकारात्मक पावलं उचलली जाऊ शकतात हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भातील चर्चा केली जाणार असल्याचं म्हणत येत्या काळात वैद्यकिय क्षेत्राची मदत आणि महाविद्यालयांतून उत्तीर्ण होऊन सेवेत येणाऱ्या डॉक्टरांचा लागणारा हातभार पाहता, हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं देखील अजित पवार म्हणाले.

येणाऱ्या काळात राज्यात वैद्यकिय महाविद्यालयं सुरु झाली, तरीही १० ते १५ दिवसांमध्ये तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, सर्वांच्याच सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiVoilence : सोनिया गांधींच्या ‘या’ आरोपाला प्रकाश जावडेकरांचे ‘हे’ प्रत्युत्तर

swarit

भाजपचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

भाजपला आता ‘जय’ चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची टोलेबाजी

News Desk